अखिल ब्राह्मण
मध्यवर्ती संस्था महिला समिती तर्फे अनेक
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले
जातात. त्यात काही
महत्वाचे कार्यक्रम म्हणजे
|
१. |
वटपौर्णिमा :
हल्लीच्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे
लावणे अतिशय गरजेचे आहे. वटपौर्णिमेला
आतापर्यंत
निरनिराळया सोसायट्या व नदीपात्रात वृक्षारोपण
केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच ते जोपासण्याचे
काम देखील संस्थेतर्फे केले जाते.
|
२. |
राखीपौर्णिमा :
समाजातील दुर्लक्षित घटक, विशेष मुले,
गतीमंद/मतीमंद/अंध मुले यांच्या शाळेत किंवा
वसतिगृहात
जावून राखी बांधणे, खेळणी वाटप, खाऊ वाटपाचा
उपक्रम केला जातो.
|
३. |
श्रीसुक्त पठण :
प्रत्येक श्रावण मासात श्रीसुक्त पठणाचे आयोजन
संस्थेतर्फे केले जाते.
|
४. |
भोंडला : अश्विन
महिन्यातील नवरात्रानंतर कोजागिरी
पौर्णिमेच्या कालखंडात पारंपारीक पध्दतीने
भोंडला केला
जातो.
|
५. |
तिळगुळ समारंभ : महिला
समितीचा तिळगुळ समारंभ हा निरनिराळया सामाजिक
संस्थेत तसेच वृध्दाश्रमात जाऊन
साजरा केला जातो. त्याचप्रमाणे एका
नवविवाहितेला साडी आणि हलव्याचे दागिने दिले
जातात.
|
६. |
महिला दिन : ८ मे रोजी
जागतिक महिला दिन संस्थेतर्फे साजरा केला
जातो. त्यात महिला स्नेहमेळावा, महिला व
युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गायनाचा
कार्यक्रम आयोजित केला जातो. ९ मार्च २०१३
ह्या साली `स्त्री भ्रुण हत्या आणि महिलांवरील
अत्याचार' विरोधात पदयात्रा काढण्यात झाली
होती. या पदयात्रेत भावसार समाज, मारवाडी,
जैन, गुजराथी समाज तसेच निरनिराळया ब्राह्मण
संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याच दिवशी
समाजातील गरजु/गरीब महिलांसाठी काम करणाऱ्या
महिलेला `वात्सल्य' पुरस्कार व सामाजिक
क्षेत्रात काम करणाऱ्या युवतीला `गायत्री'
पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. |